कोह-ई-नूर…

खरं सांगायचे झाले तर आमच्या मते… तो हिरा तिकडेच ठेवाय हवा जोपर्यंत तो त्यांना बोचत नाय… आता ह्यांका सांस्कृतिक देवाणघेवाण कित्याक जाय… तो कोहीनूर बघत बसा म्हणांव… भेटेल तुमका देव थयच…। इकडे यायची पण काय्यक गरज नाय… तिकडून फक्त दररोज उगवत्या सूर्याला पाणी योडा म्हंजे जाले।

बोचाय लागला म्हंजे बोच्यातून जाळ व्हायला लागला की बोलवा एखांदा नवीन भारतीय आयुर्वेदिक वैद्य। मग तो मस्त ढुंगणबस्ती देईल आणिक जाळ थंड व्हईल…

काम एकदम सोप्पे आहे हो ते।

अवो हिरा म्हणजे पृथ्वीच्या पोटातला कोळसाच की वो… त्याला पैलू पाडेपर्यंत… तेव्हा अजून आटे पडले नाहीत हेच खरे।

काय म्हणावे ह्याला…?

देशप्रेम की राष्ट्रप्रेम…?

देशभक्ती की राष्ट्रभक्ती…?

विश्वबंधुत्व की आकाशगंगाभगिनीप्रेम?

परमेश्वरा, ह्या (श्री. तरूण गोगोई) माणसाला सुखरूप आसामात परत पाठव रे बाबा! कारण ह्याका तेथील जनतेची अधिक सेवा करायची संधी मिळो जाय असे आमका वाटते…

माहित नाही कोणत्या पक्षाच्या वंशज आहे हा… पण तो पक्षीवंश तिथेतरी टिकायलाच हवा ना?

आता ह्याला इकडे पाठवायची काय गरज…? तिकडे अमेरिकेत स्वस्तात उप४ होतात की अशा रोगांवर… नाहीतर एखादा तिकडचा वैद्यबुवा बोलावून घ्यायचा… अहो.. समद्यान्नी मुंबईस येण्याची काय गरजच नाय… मुंबईच्या दोतोरास थय बोलावुक जाय। त्या चिन्यांनी नाय डॉ. द्वारकानाथास थय बोलावले आणि नेहरूंनी सुद्धा त्यांका रोकडे थय धाडले, तेव्हासून शांतच हायत ते लोक…।

आमचा एक सहाध्यायी आसाम मधला त्याला आम्ही सगले प्रेमाने गांडू टायगर म्हणायचो कारण तो नेहमी वाघासरशी भगव्या-पिवळ्या चट्यापट्याची हाफचड्डी घालून इकडे तिकडे फिरत असे… त्या गांडू टायगरचे नामकरण नंतर जी.टी. असे करण्यात आले होते… त्याचीच आम्हांस आज आठवण झाली.. म्हणून आम्हीसुद्धा जीवंत आहोत हे आज पुनः जाणवले… नाहीतर गेले ३ दिवस आम्ही स्वतःला मोडीतच काढले होते… (अहो म्हणजेच जाळावर प्राणायाम करत कुंभकात होतो … असे म्हणायचे… :-) त्यामुळे नेटनिशी लिहू शकलो नाही पण किती जणांनी ती वाचली ह्याची नोंद मात्र सापडेल शोधली तर…

॥ ॐ हरिः ॐ ॥

२६ जुलै २०१० – सर्वात मोठा दिवस!

तर काल सकाळी (म्हणजे पहाटे १ वाजता) जाग आली कारण त्याच्या आदल्या दिवशी थकून लवकर झोपलो होतो… तर पत्नीचा विश्रांती घेण्याचा आग्रह नाकारून कामाला सुरुवात केली ती भोजनाने… सकाळी सकाळी २ च्या सुमारास वरण भात खाल्ला आणि मग काय करायचे ह्याचा विचार करू लागलो तेव्हा लक्षात आले की माझे एक बालपणीचे आवडते काम (इतर कोणाकडून न झाल्याने चुकून) शिल्लक राहिले आहे…

ताबडतोब कामाला लागलो… ते म्हणजे साठवलेल्या दुधाच्या साईच्या दह्या पासून ताक करणे… :-)

साधारण २-५ लिटर दह्याचे ताक केले आणि सर्व आवरून सकाळी ५.१५ च्या सुमारास पत्नीस जागे करून पुढील दिवसभर नित्यकर्म करून संध्याकाळी घरी आलो तेव्हा (आमच्या पत्नीने आम्हांस सकाळी विचारला) तोच प्रश्न आमच्या घरकामवालीने आमच्या पत्नीस विचारला होता हे पाहून स्वमन खरोखर धन्य जाहले… कारण सकाळीच पत्नीस सांगितले होते तेवढे विचारू नका… सांगणार नाही… :-)

तो प्रश्न: त्या कळशीतून लोणी बाहेर कसे काढले…?

कारण वानराला पकडण्याचा उपास जसा करतात की शेंगा लहान गळ्याच्या कळशीत भरून तिकडे वानराला बोलवतात तसाच प्रकार होता तो… वानराने मुठीत शेंगा पकडल्या की ती मूठ बाहेर येऊ शकत नाही तो उंगली टेढी किये बिना मख्खन केसे निकालो?

आम्ही (हा झाला अहंभाव) विचारपूर्वक ताक करायला कळशी वापरली होती… कारण रवीने ताक करत असताना ते इकडे तिकडे उडू नये म्हणून (आम्ही अत्यंत शांत मनाने जसजसे सुचत गेले तसे करत गेलो आणि सर्व लोणी मिळविले).

नंतर ते सर्व लोणी बाहेर काढून व्यवस्थित शीतकपाटात ठेवून (मात्र काम फत्ते झाल्यावर हात धुवून टाकणार होतो तेवढेच चाटून गिळून टाकले अन्यथा लोणी खाण्याचा प्रयत्न नाही केला वा मनोशांतता ढळली असती)…. सर्व मनोआयुधं साफ करून आम्ही शांतपणे कार्यालयात गेलो… आणि उशीरा परतलो…

पुन्हा साधारणपणे रात्री १० च्या सुमारास झोपीस्वार जाहलो… ह्याचा अर्थ…?

हे सर्व कोणी शिकविले आम्हांस ती आमची अत्यंत लाडकी आई… आमची पहिली गुरु। शिकविले हे म्हणणे खरे तर चुकीचे आहे कारण ती काय करते हे आम्ही मनात साठवून ठेवले होते… आणि वडील कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्याकडून शिकायची संधी कमी लाभली… सध्या मात्र आईवडील एकच आहेत। हे कसे?

काल दिवसभर आम्ही मातुल स्मरणमात्रेण पावन झालो…!

इति।

मनोशृंखला…

सावरकरांनी पुण्यात केलेल्या विदेशी कपड्याच्या होळीचे स्मारक बांधणे चालू होते तेव्हाची गोष्ट…

आमची स्वारी काही कारणाने कर्वे रस्त्यावरील त्या स्थानी भरकटली… आणि तेथील दृष्य पाहून अत्यंत दुःखी झाली…

कारण तेथे मजूरकाम करणाऱ्या एका महिलेने किंवा बाबाने तेथे त्यांच्या लहान दीड-दोन वर्षांच्या मुलीचा पाय सुतळीने एका खांबाला बांधून ठेवला होता…

अत्यंत दुःखी अंतःकरणाने आम्ही परतलो… त्यानंतर परवा आमच्या अर्धांगीने आपल्याकडे बऱ्याच वेळा काम करणारी मंडळी त्यांच्या लहानग्यांचा एक पाय बांधून ठेवतात जवळपासच्या खांबाला वगैरे जेणेकरून त्या बारक्याच्या जीवीताला आई वडील काम करत असताना इकडे तिकडे वावरण्याने होणारा कोणताही धोका पोहोचत नाही… असे सांगेपर्यंत आम्ही ह्या विषयावर कधीही कोणाशीही वाच्यता केली नाही… आता ते दृष्य फक्त मलाच माहित होते… मग ते तिला कसे कळले…?

अशा रीतीने आमच्या मनो व्यथेचे निराकरण झाले ते साल म्हणजे २०१० अर्थात शके १९३२ आणिक शिवाजी शके…

हे दृष्य आम्ही कधि पाहिले असावे हे त्या स्मारकाचे बांधकाम करणाऱ्यांना ठाऊकच आहे…

सदाचरण आणि सत्कायदा

ही ती सूचना…
20100727

आता ही सूचना प्रकाशित करणे हे देखिल बेकायदा आहे हे किती जणांच्या लक्षात येते ते पाहू…

कारण ही सूचना देखिल त्याच अंकात प्रसिद्ध झाली आहे…

आता वरील सूचना प्रसिद्ध केल्यानंतर…
satdharma

हे प्रसिद्ध करणे क्रमप्राप्तच होते…

म्हणून…

lastpage

आणि ते करीत असताना आम्ही जर गुन्हा केला असे वाटत असेल तर तो कोणाचा ह्याचा कृपया शोध घ्यावा ही सप्रेम विनंती.

कारण आम्ही गुन्हा कोणता केला ते प्रथम आपणांस सांगावे लागेल…

कळावे लोभ असावा.

आपला,
नातेवाईक आणि स्नेही