तर काल सकाळी (म्हणजे पहाटे १ वाजता) जाग आली कारण त्याच्या आदल्या दिवशी थकून लवकर झोपलो होतो… तर पत्नीचा विश्रांती घेण्याचा आग्रह नाकारून कामाला सुरुवात केली ती भोजनाने… सकाळी सकाळी २ च्या सुमारास वरण भात खाल्ला आणि मग काय करायचे ह्याचा विचार करू लागलो तेव्हा लक्षात आले की माझे एक बालपणीचे आवडते काम (इतर कोणाकडून न झाल्याने चुकून) शिल्लक राहिले आहे…
ताबडतोब कामाला लागलो… ते म्हणजे साठवलेल्या दुधाच्या साईच्या दह्या पासून ताक करणे…
साधारण २-५ लिटर दह्याचे ताक केले आणि सर्व आवरून सकाळी ५.१५ च्या सुमारास पत्नीस जागे करून पुढील दिवसभर नित्यकर्म करून संध्याकाळी घरी आलो तेव्हा (आमच्या पत्नीने आम्हांस सकाळी विचारला) तोच प्रश्न आमच्या घरकामवालीने आमच्या पत्नीस विचारला होता हे पाहून स्वमन खरोखर धन्य जाहले… कारण सकाळीच पत्नीस सांगितले होते तेवढे विचारू नका… सांगणार नाही…
तो प्रश्न: त्या कळशीतून लोणी बाहेर कसे काढले…?
कारण वानराला पकडण्याचा उपास जसा करतात की शेंगा लहान गळ्याच्या कळशीत भरून तिकडे वानराला बोलवतात तसाच प्रकार होता तो… वानराने मुठीत शेंगा पकडल्या की ती मूठ बाहेर येऊ शकत नाही तो उंगली टेढी किये बिना मख्खन केसे निकालो?
आम्ही (हा झाला अहंभाव) विचारपूर्वक ताक करायला कळशी वापरली होती… कारण रवीने ताक करत असताना ते इकडे तिकडे उडू नये म्हणून (आम्ही अत्यंत शांत मनाने जसजसे सुचत गेले तसे करत गेलो आणि सर्व लोणी मिळविले).
नंतर ते सर्व लोणी बाहेर काढून व्यवस्थित शीतकपाटात ठेवून (मात्र काम फत्ते झाल्यावर हात धुवून टाकणार होतो तेवढेच चाटून गिळून टाकले अन्यथा लोणी खाण्याचा प्रयत्न नाही केला वा मनोशांतता ढळली असती)…. सर्व मनोआयुधं साफ करून आम्ही शांतपणे कार्यालयात गेलो… आणि उशीरा परतलो…
पुन्हा साधारणपणे रात्री १० च्या सुमारास झोपीस्वार जाहलो… ह्याचा अर्थ…?
हे सर्व कोणी शिकविले आम्हांस ती आमची अत्यंत लाडकी आई… आमची पहिली गुरु। शिकविले हे म्हणणे खरे तर चुकीचे आहे कारण ती काय करते हे आम्ही मनात साठवून ठेवले होते… आणि वडील कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्याकडून शिकायची संधी कमी लाभली… सध्या मात्र आईवडील एकच आहेत। हे कसे?
काल दिवसभर आम्ही मातुल स्मरणमात्रेण पावन झालो…!
इति।