Archive for the Category »ई-नोंदी «

यदा..

तो जनबंधुओं आजका दैनिकसवाल ये रहा की कल का दैनिकसवाल कौन७ था-रहें-जाये?

और परसों का दैनिकसवाल ये रहा की ये जो हम बात कर रहे है….वो बीता हुआ कल है या आऩेवाला?

अंऋता…

अमृतातेंही पैजां जिंके असे रसाळ वर्णन करणाऱ्या ज्ञानेश्वर माउलींसाठी आमचीहीएक सप्रेम भेट…

तोच शब्द आम्ही अंऋता असा लिहून “मराठी पाऊल चढते पुढे” असे आज (म्हणजे तार सप्तकात ह्या ८वड्यात) म्हणतो…

कारण आम्हांसी त्यातील मृत ह्या शब्दछेदावर विरजण घालीजे व्हते…

. . . आणि तुका म्हणे.. .. ..
ऐश्यानरामोजुनीमाराव्यापैजारा।…

जय होय

थोडेसे सामान्य ज्ञान पाजळायला प्रत्येकाला सोय असायास हवी लोकशाहीमध्ये आणि ठोकशाहीमध्येसुद्धा नाहीतर जीवन अगदीच निरस आणि बेचव होऊन बसायचे…

तर जय हो विषयी आमचे पाजळलेले २ शब्द…

“हो” ह्या शब्दउच्चारानुसार अमेरिकेत एक अर्थ आहे.. कारण तिकडे अनेक सामाजिक संप्रदायातील जनता त्या “हो” चा अर्थ वेश्या असाच घेतात…

अगदी सुनील गावस्करच्या ला-होर उच्चारातील “होर” ह्याचा उच्चार तेथील अनेकविध नागरिक “हो” करतात… असे असूनही त्या जय हो ला कुठलासा अमेरिकन पुरस्कार मिळाला म्हणून आम्हां काय वाईट वाटले नाय, मात्र त्या बाबतीत आम्ही १००% श्री अमिताभ आणि ५०% बच्चन यांचे बाजूनेच आहोत…

श्री दत्तात्रेयांनी मानलेले अनेकविध गुरुमध्ये वारयोशिताही एक गुरु असलेने, आम्ही तिकडे कानाडोळा केला पण अगदीच भावना अनावर वाटल्या म्हणजे आतून उकळीच फुटली वो, म्हणून ह्या विषयावर आज लेखणी टेकिवली.

त्यामुळेच २-५ वर्षापूर्वी गोवा विधानसभेतील अभूतपूर्व गोंधळातील आवाजी मतदानादरम्यान ऐकू आलेला उच्चपातळीतील एकमेव “होय” आजही आमच्च्या कानात सुखावहच ठरतो…

जय जय जय जय हे।

सनलाईट (साबण) आणि आम्ही…

मध्ये वराच काळ आम्ही स्वतःचे कपडे अंगाच्या साबणाने धुवून पाहिले पण कोणचा तो संस्कृत सुभाषित आहे त्यापरमाणे आमच्या हंडरवेअरचा रंग काही काळा झाला नाही… तसे डोक्यावरचे केसही पिवळे झाले नाहीत डोळे भगवे झाले नाहित की वस्त्र शुभ्र जाहले नाही…

अनेक लोकांच्या जीवनांत त्यांना परमेश्वर एक वेगळाच साबण देतो अशी आमची कविकल्पना आहे… की ज्याचे नांव सनलाईट अर्थात कुलदीपक!

आता तो कोणत्या स्थानावर आला तर त्याला कुलदीपक म्हणावे आणि कुठल्या स्थानावर आला तर वरवंटा म्हणावे ह्याबाबत मात्र काही खास मतप्रवाद शोधूनही नाही सापडला…

आम्हांस वाटते की सध्याच्या मुलींचीमतरताभासलीयुगात तो ८व्या स्थानावर आला तरच तो भगवान श्रीकृष्ण गृहितावा अन्यथा वरवंटा समजून पाटावर बसवावा… म्हणजे बागायतींची शिंपणी करायला… अथवा पाट्यावर फिरवून चटणी कराया धर्मपत्नीस हालात-ए-मदत करावी… जमल्यास एखांदा नारिकेल अधून मधून वाढवून तोही हिरव्या कंच मिरच्या बरोब्बर ठेचा खाताना कोण ती चव भेटणार ह्याची हालात-ए-चिंता नसावी…

आता हे दिव्य कळायला अगोदरच्या ६~७ मुलींची नीट काळजी घ्यावी म्हणजे मुलांमध्ये नीट अंतरपाट ठेवले तर दर ३ वर्षाला १ ह्याप्रमाणे २४ वर्षे कुलदीपकाय तपस् करावे… अशी २४ वर्षे आणि २१ व्या वर्षी १८ वर्षे वयाच्या मुलीशी लगीन केलेले गृहितून तीचं वय २१ होयाची वाट पहाणे म्हणजे झाले की वयाचे ४८ साल आणि वाजलेच की बायकोचे बारा!

झेंडा…

कायहो ते रेल्वेला हिरवाच का दाखवावा लागतो…?

त्याऐवजी पिवळा, काळा किवा भगवा झेंडा का नाही दाखवत?

म्हणजे लाल हा रंग अगोदरच काम थांबवण्यासाठी वापरतात नाहीतर ते सुद्धा वापरले असते आपण…

मला तरी वाटते तिरंगा दाखवूनही ते काम करायला हरकत नाही… आता त्यासाठी तत्पूर्वी झेंडाकूट तपासायास हवे हे मात्र खरें।

पहा विचार करून म्हणजे हिरवा फुत्कार वगैरे म्हणणाऱ्यांना काही संधीच मिळणार नाही हो…।

अगदीच दुसरे काही सापडत नसेल तर कबुतराचा राखाडी रंग अर्थात पारवा रंगही धावेल…

एकनाथ महाराज नाही का कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले होते…

कारण सर्वानुमते पांडुरंग श्वानरुपात येऊन पुरणपोळी खायला पळीवली…

तर देखिला का आजका दैनिकसवाल?

आणि काय आहे की रेल्वेचे होणाऱ्या अपघाताची पुरणपोळी एकाच समाजावर भाजायासी संधी कोणाला मिळूनये हीच आमची शुभेच्छा। ती सर्व (माफ करा पण जंन्तेची असे म्हणत नाही) समाजाची सार्वत्रिक जबाबदारी असायला हवी ना..?

.
.
बळे सोडिता घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥
.
.
.