स्वातंत्र्य चळवळीचा व्यवस्थित आढावा घेतला असता असे लक्षात येते कि स्वातंत्र्यचळवळीचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या सर्व दिवसाच्या सेनानींनी एक एक सामाजिक चूक दुरुस्त करित अशी वेळ आणली की परमेश्वरालाही हा प्रश्न पडला असावा. तो कोणता? हे जाणून घेणे हीच खरी स्वतःच्या स्वातंत्र्याची चाचणी परिक्षा ठरते…
आता ह्यात किती जण उत्तीर्ण होतात आणि किती अनुत्तीर्ण हा विषय नसून तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास किती झालाय एवढेच जाणता येऊ शकते (हे ही लेखकाचे वैयक्तिक मतच आहे)
ह्या सर्वांची यथार्थ नोंद सावरकरांनी लिहीलेल्या समग्र वाङ्मयात आढळून येते… आता झाली वैयक्तिक आणि ऐतिहासिक नोंद ही की ज्या एका विशिष्ठ वेळी मी नाशिकला फिरकलो तेव्हा मला भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने हे पुस्तक मिळाले की जे तेथील पुस्तक प्रदर्शनातील विक्रेत्याने आवर्जून वाचनासाठी दिले…
वेद हे देखिल सृष्टीतील परमेश्वराने प्रवासातील मार्गदर्शनार्थ ठेवलेल्या पाऊलखुणाच असे आमचे मत एकही वेद न वाचता केवळ स्वानुभूतीवरून आहे.
असे कितीही असले तरीही शेवटी क्रीयेविण वाचाळता व्यर्थच… कारण उत्तरादाखल तारीख १४ वा १५ ऑगस्टच आली. जी धर्म राजाच्या नरो वा कुंजरो वा सम ठरते… म्हणून भारतीय वानर सेनाच सर्व राम (नाव) कामी उपयुक्त. हे (अधम रक्त रंजिते) येरागबाळ्याचे कामच (उदरभरण) नोहे (जाणिजे यज्ञकर्म).
प्रस्तुत लिखाण हा त्या आम कार्यसमृद्धीतला खारीचा वाटाच…
What is your name? ह्या सरळ वाटणाऱ्या कूट प्रश्नाचे उत्तर नेम सहाय्यकाच्या प्रत्येक कवितेनंतर एक एक तवा फोडता फोडता अखेर घोरीचाच वेध घेऊन शिन्धु संस्कृतीचे एक पायंडारूपी उदात्त उदाहरण दाखिले आहे.
आता प्रश्न उरतो की आपण आपले डोळे कोणी फोडेपर्यंत वाट बघायची काय? आणि खरं तर हा वैयक्तिक प्रश्नच आहे त्यामुळे कोणाच्या प्रेशर कुकरची शिट्टी कधी वाजते व कोण किती शिट्ट्या होईपर्यंत आपला भात शिजायची वाट पाहू शकतो हाही वैयक्तिक क्षमतेचाच लेखाजोखा ठरतो.
आता जर Direct Action ची घोषणा जीन्नाह कडून घडली म्हणजे त्यांची शिट्टी अगोदर वाजली म्हणावे तरी त्याचा अर्थ त्यांची डाळ नक्की शिजली असा ही होत नाही.
आता पाकिस्तान आणि चीनकडून भारताबाबत सिमोल्लंघन घडले म्हणावे तर हा हिंदु संस्कृतीचाच विजय ठरेल आणि त्यांनी हल्ला केला म्हटले तर त्यांना स्वमर्यादापालन करता आल्या नाहीत म्हणजे पर्यायाने ते हतबल झाले असा होतो.
अतः
मौनं सर्वार्थ साधनं
इति कीलकम्