तर आजचा लेख हा कोंकण रेल्वेच्या संबंधित आंदोलनासाठी… विशेष! ते आमच्या गावाच्या आसपास रेल्वेचे रूळ ५ फूट खचले तर आता रेल्वेने गोस्लोकरून ते वेळेवर टाकले नाहीत तर नाणे स्वाभिमान आंदोलन कुठे गोव्यात जाऊन करणार का? आणि केले तर कोणासमोर..? हे म्हणजे तेच का हो की जे प्रतापरावांच्या काळात कोंकणातून कसेबसे गोव्यात जाऊन गोव्यातून विमानाने मुंबईला आले ते…?
की गणपतीला जादा गाड्या सोडून त्या दीदी फकस्त लांज्यापर्यंतच दौडवणार…?
छान.. जाम मजा येणार ह्यावेळी गणपतीला…
तिकडे अगणित शहा यांच्या नंतर मोदींनी तयार रहावे असा इशारा देणारा कॉंग्रेस पक्ष सज्जनकुमार यांच्यानंतर कोणाला तयार रहायला सांगणार हा तर लय भारी सवाल आहे…? अर्थाअर्थी दोन्हींचा संबंध नसेलही पण आपला तो बाळ्या हे अगदी कावळ्याच्या नजरेने टिपायला मिळते हो त्याला आम्ही काय करणार… कोणाचे १३वा चालू आहे ह्याकडे लक्ष ठेवावेच लागतं कारण शेवटी गेलेल्यांना पुढे ढकलायचे आहे ना…?
तर आम्ही मात्र एका वेगळ्याच कामात मग्न असलेने जरा लिखाण कमी आणि खाणकाम जास्त होण्याची शक्यता आहे..
जाता जाता एक शेरा मारावासा वाटतोय अगदी वाईट वाटून घेऊ नका…
कालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अचूक २५ नवीन लोकांनी साईटला भेट दिल्याने आनंद झाला तो घ्या वाटून… आणि उरला शिल्लक तर द्या परतून…।
आमच्या मते… सध्याचे राष्ट्रीय भाजपाचे राजकारण आणि कॉंग्रेसचे विरोधात बसून केलेले कारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात त्यामुळे कोणीही सत्तेत असले तरी राज्य आठव्याचेच आहे हे नक्की.. असे काही आम्ही लिहीले तर डाव्या हाताने टाळी वाजवायला पुढे केलेला हात वाजवायला दाहिना हाथ कोण?
लेखणी टेकविली!
