देशप्रेम की राष्ट्रप्रेम…?
देशभक्ती की राष्ट्रभक्ती…?
विश्वबंधुत्व की आकाशगंगाभगिनीप्रेम?
परमेश्वरा, ह्या (श्री. तरूण गोगोई) माणसाला सुखरूप आसामात परत पाठव रे बाबा! कारण ह्याका तेथील जनतेची अधिक सेवा करायची संधी मिळो जाय असे आमका वाटते…
माहित नाही कोणत्या पक्षाच्या वंशज आहे हा… पण तो पक्षीवंश तिथेतरी टिकायलाच हवा ना?
आता ह्याला इकडे पाठवायची काय गरज…? तिकडे अमेरिकेत स्वस्तात उप४ होतात की अशा रोगांवर… नाहीतर एखादा तिकडचा वैद्यबुवा बोलावून घ्यायचा… अहो.. समद्यान्नी मुंबईस येण्याची काय गरजच नाय… मुंबईच्या दोतोरास थय बोलावुक जाय। त्या चिन्यांनी नाय डॉ. द्वारकानाथास थय बोलावले आणि नेहरूंनी सुद्धा त्यांका रोकडे थय धाडले, तेव्हासून शांतच हायत ते लोक…।
आमचा एक सहाध्यायी आसाम मधला त्याला आम्ही सगले प्रेमाने गांडू टायगर म्हणायचो कारण तो नेहमी वाघासरशी भगव्या-पिवळ्या चट्यापट्याची हाफचड्डी घालून इकडे तिकडे फिरत असे… त्या गांडू टायगरचे नामकरण नंतर जी.टी. असे करण्यात आले होते… त्याचीच आम्हांस आज आठवण झाली.. म्हणून आम्हीसुद्धा जीवंत आहोत हे आज पुनः जाणवले… नाहीतर गेले ३ दिवस आम्ही स्वतःला मोडीतच काढले होते… (अहो म्हणजेच जाळावर प्राणायाम करत कुंभकात होतो … असे म्हणायचे…
त्यामुळे नेटनिशी लिहू शकलो नाही पण किती जणांनी ती वाचली ह्याची नोंद मात्र सापडेल शोधली तर…
॥ ॐ हरिः ॐ ॥
